Publish Date: Thu, 16 May 2019 (10:46 IST)
Updated Date: Thu, 16 May 2019 (10:48 IST)
दुष्काळग्रस्त भागामध्ये शेतकऱ्यांना चाऱ्यासाठीचं अनुदान वाढवून मिळावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. शरद पवारांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळाबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीला पवार यांच्यासह अजित पवार, राणा जगजित सिंह पाटील हे देखील उपस्थित होते. 'एबीपी माझा'नं यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.
दुष्काळग्रस्त जनावरांना भागात ऊस सोडून इतर चाराही दिला जावा. तसंच चारा अनुदान 90 रुपयांवरून 110 रुपये केलं जावं, अशी मागणी शरद पवार यांनी केली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चारा अनुदान वाढवून शंभर रूपये करण्याची घोषणाही केली.
शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये दुष्काळी भागात पाण्याचं आणि अन्नधान्याचं नियोजन, नागरिकांच्या हाताला काम, फळबागा, छावण्या या विषयांवरही चर्चा झाली.