Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विद्यापीठं रक्तानं भिजतायत, शिवसेनेचा 'सामना'तून निशाणा

विद्यापीठं रक्तानं भिजतायत, शिवसेनेचा 'सामना'तून निशाणा
"विद्यापीठं, महाविद्यालयं रक्तानं भिजवायची, विद्यार्थ्यांना मारहाण करायची आणि त्यातून पेटलेल्या होळीवर सत्तेची पोळी शेकायची. इतकं निर्घृण राजकारण कुणी केलं नव्हतं," असं म्हणत शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधलाय.
 
देशात अराजकता निर्माण करणारे राजकारण धोकायदक असल्याची चिंताही अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलीय.
 
"नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत गोंधळ निर्माण झाला असून, त्याविरोधात मोर्चे निघतायत. हिंदू विरुद्ध मुस्लीम दरी पडून दंगली होतील, अशी आशा भाजपला होती, ती फोल ठरली," असा गंभीर आरोप या अग्रलेखातून करण्यात आलाय.
webdunia
तसंच, "CAA कायद्याचा फटका अनेक राज्यांमध्य हिंदूंनाही बसतोय. त्यामुळं हिंदूही चिडले असून, भाजप विरुद्ध बाकी सर्व अशी स्थिती निर्माण झाल्यानं भाजपची गोची झालीय. त्यामुळंच सूडभावनेतून उपद्व्याप केले जातायत. जेएनयूतील राडा त्याचाच भाग आहे का, अशी शंका येते." असं 'सामना'त म्हटलंय.
 
दुसरीकडे, जेएनयूतल्या हिंसेचा निषेध करणारे जेएनयूचे माजी विद्यार्थी असलेले परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दुसऱ्याच दिवशी टीका केलीय. ते म्हणाले, "मी जेव्हा जेएनयूत होतो, तेव्हा तिथं तुकडे तुकडे गँग नव्हती."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्ली निवडणूक: अरविंद केजरीवाल 'सॉफ्ट हिंदुत्व' कार्ड आजमवणार का?