Publish Date: Fri, 12 Apr 2019 (08:26 IST)
Updated Date: Fri, 12 Apr 2019 (08:28 IST)
लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण न केल्याचं नमूद केलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
दिल्ली विद्यापीठाच्या मुक्त शिक्षण विभागातून बी.कॉमची प्रथम वर्षाची परीक्षा दिली. मात्र तीन वर्षांचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं नाही, अशी माहिती इराणी यांनी शपथपत्रात दिली आहे.
इराणी यांनी 2004 आणि 2014 मध्ये निवडणूक अर्ज दाखल करताना वेगवेगळी माहिती दिली होती. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा विषय वादग्रस्त ठरला होता.
यावेळी त्यांनी प्रत्यूत्तर देताना आपण येल विद्यापीठातून पदवीधर असल्याचं सांगितलं होते