Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कर्जमाफीचा पैसा आणणार कुठून ? - रामदास आठवले

कर्जमाफीचा पैसा आणणार कुठून ? - रामदास आठवले
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे फक्त दोन लाख रापयांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. पण त्यासाठी लागणारा निधी कोठून आणणार, असा प्रश्न केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थित केला आहे.
 
ही घोषणा अन्यायकारक असल्याची टीकाही रामदास आठवले यांनी केली आहे. रविवारी (22 डिसेंबर) पुणे दौऱ्यावर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
काँग्रेस आणि शिवसेनेत सावरकर यांच्यावरून मतभेद आहेत. असे अनेक मुद्दे भविष्यात समोर येतील. त्यामुळे समान विचारसरणी असलेल्या शिवसेना आणि भाजपने पुन्हा एकत्र यावं, असंही आठवले यांनी म्हटलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ठाकरे आडनाव लावल्याने कोणी ठाकरे होत नाही - अमृता फडणवीस