rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Shravan 2025 सर्वात मोठा श्रावण मेळा भारतातील या पाच ठिकाणी भरतो

PehleBharatGhumo
, गुरूवार, 17 जुलै 2025 (07:30 IST)
India Tourism : श्रावण महिना काही दिवसांतच सुरु होणार असून श्रावण हा देवांचे देव महादेव यांना समर्पित असून खूप पवित्र महिना मानला जातो. तसेच या महिन्यात अनेक जण तीर्थयात्रा करणे देखील पसंत करतात. तुम्हाला देखील महादेवाचे मंदिरांचे दर्शन घ्यायचे असल्यास तुम्ही देशातील या काही खास ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकतात. जिथे सर्वात मोठे आणि प्रसिद्ध श्रावण मेळे आयोजित करण्यात येतात. जिथे लाखो भाविक कांवर यात्रा, रुद्राभिषेक आणि शिव दर्शनासाठी दूरदूरून येतात. हे मेळे केवळ धार्मिकच नाहीत तर संस्कृती, परंपरा आणि भक्तीचा संगम देखील आहे. तसेच ज्यामध्ये तुम्ही देखील सहभागी होऊ शकता. तर चला जाणून घेऊ या भारतात श्रावण मेळे कुठे भरतात. 
बाबा महाकाल मेळा
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातील उज्जैन येथे आहे. या मंदिरात भस्म आरती केली जाते आणि सावन महिन्यात भव्य मेळा भरतो.
 
बाबा बैद्यनाथ धाम
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले बैद्यनाथ ज्योतिर्लिंग झारखंडमधील देवघर येथे आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात देशभरातील कावडीया देवघर येथे जल अर्पण करण्यासाठी येतात. भाविक सुलतानगंज येथून गंगाजल आणून शिवलिंगाला अर्पण करतात.  येथे भाविकांचा मेळा भरतो.
 
हरिद्वार कवडी मेळा
देवभूमी उत्तराखंडच्या पवित्र गंगा नगरी हरिद्वारमध्ये श्रावण महिन्यात एक मेळा देखील भरतो. देशातील सर्वात मोठा कवडी मेळा हरिद्वारमध्ये भरतो. गंगाजल भरण्यासाठी कोट्यवधी शिवभक्त येथे येतात.
webdunia
बाबा केदारनाथ यात्रा
उत्तराखंडचे पवित्र तीर्थक्षेत्र केदारनाथ धाम येथे श्रावण महिन्यात विशेष गर्दी दिसून येते. बाबा केदारनाथ हे १२ ज्योतिर्लिंगांमध्ये समाविष्ट आहे, तसेच उत्तराखंडच्या चार धामांपैकी एक आहे. भाविक पायी प्रवास करून येथे दर्शनासाठी येतात.
 
तारकेश्वर मेळा
पश्चिम बंगालमध्ये तारकेश्वर मेळा आयोजित केला जातो. येथे राजधानी कोलकातापासून ५० किमी अंतरावर असलेल्या तारकेश्वरमध्ये सावनमध्ये मोठे मेळे आणि रात्रीचे जागरण भरते.
ALSO READ: व्यादेश्वर महादेव मंदिर रत्नागिरी

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बॉलिवूडमधील तेजस्वी सेलिब्रिटींपैकी एक बार्बी डॉल कतरिना कैफने वयाच्या १४ व्या वर्षांपासून केली कारकिर्दीला सुरुवात