Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सलमान खानला आता Y+ श्रेणीची सुरक्षा

salman khan
, मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (14:26 IST)
लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमान खानला आलेल्या धमक्यांमुळे महाराष्ट्र सरकारने त्याची सुरक्षा Y+ श्रेणीत वाढवली आहे. आता चार सशस्त्र सुरक्षा अधिकारी नेहमीच सलमानसोबत असतील. यापूर्वी सलमान खानला मुंबई पोलिसांनी सामान्य पोलीस संरक्षण दिले होते.
  
जूनमध्ये, सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकीचे पत्र मिळाले होते, ज्यामध्ये सलमानचीही पंजाबी गायक मूसवालासारखीच स्थिती होईल, असे म्हटले होते.
  
जेव्हा या टोळीतील काही लोकांना पकडले गेले तेव्हा त्यांनी सलमान हे त्यांचे लक्ष्य असल्याचे मान्य केले आणि त्यांनी सलमानच्या घराची रेकीही केली. त्यामुळे खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकारने सलमानच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
  
त्याचप्रमाणे अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांनाही धमक्या येत आहेत, त्या लक्षात घेऊन त्यांना एक्स सिक्युरिटी देण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rambha Car Accident: अभिनेत्री रंभाच्या कारला अपघात