Publish Date: Thu, 07 May 2020 (06:21 IST)
Updated Date: Wed, 06 May 2020 (21:24 IST)
अशी मान्यता आहे की भगवान बुद्ध श्री हरि विष्णूंचे अवतार आहे. या पौर्णिमेला सिद्ध विनायक पौर्णिमा किंवा सत्य विनायक पौर्णिमा देखील म्हणतात. हिंदू धर्मात पूजा-पाठ करण्यासाठी काही विशेष नियम सांगण्यात आले आहे ज्यांचे पालन न केल्यास भक्तांची ईश्वरवर कृपा कमी होते. बौद्ध पौर्णिमेला ईश्वर अराधना करताना चुकुनही हे कामं करु नये.
- या दिवशी मांसाहाराचे सेवन टाळावे.
- घरात कोणत्याही प्रकाराचा वाद निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी.
- कोणालाही अपशब्द बोलू नये.
- या दिवशी खोटे बोलणे टाळावे.
या दिवशी पूजा पाठ केल्यावर गरीबांना भोजन द्यावे आणि त्यांना कपडे दान करावे. तसेच घरात पक्षी पिंजर्यात असल्यास त्यांना स्वतंत्र करावे. नंतर संध्याकाळी चंद्राला जल अर्पित करावे.