Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला?

shivaji maharaj aarti
, सोमवार, 3 एप्रिल 2023 (13:17 IST)
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी वयाच्या 50 व्या वर्षी झाला. त्यांच्या सह त्यांच्या चवथ्या पत्नी महाराणी पुतळाबाई देखील सती झाल्या. 
 
शिवाजी महाराजांचा मृत्यू प्रकृती अस्वास्थ्यामुळे झाला असे काही इतिहासकारांचे मत आहे. दुसरीकडे, काही लोकांचा असा विश्वास आहे की शिवाजी महाराजांच्या राण्या आणि मंत्री यांनी त्यांना विष दिले होते, त्यामुळे रक्ताच्या उलट्या होऊन शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. तरी यामागे काय सत्य आहे हे स्पष्टपणे सांगता येत नाही.
 
ब्रिटीश नोंदी सांगतात की 12 दिवस आजारी राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोर्तुगीज भाषेतील बिब्लिओटेका नॅसिओनल डी लिस्बोआ या समकालीन दस्ताऐवजात मृत्यूचे कारण अँथ्रॅक्स आहे. तथापि शिवाजीराजांच्या चरित्रातील सभासद बखरचे लेखक कृष्णाजी अनंत सभासद यांनी मृत्यूचे कारण ताप असल्याचे नमूद केले आहे. शिवाजीराजांच्या हयात असलेल्या पत्नींपैकी निपुत्रिक आणि सर्वात कमी वयाच्या असलेल्या पुतळाबाई या त्यांच्या अंत्यसंस्कारात सती गेल्या. दुसऱ्या हयात असलेल्या जोडीदार सकवारबाई यांना एक तरुण मुलगी असल्यामुळे सती जाण्याची परवानगी दिली गेली नाही.
 
शिवाजी भोंसले महाराज (छत्रपती शिवाजी महाराज) यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील शहाजी भोंसले हे एक शक्तिशाली आणि प्रभावशाली सरंजामदार होते. त्यांची आई जिजाबाई यांचा शिवरायांवर खूप प्रभाव होता. छत्रपती शिवाजी हे भारतातील सर्वात शूर राज्यकर्त्यांपैकी एक होते, ते मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. छत्रपती शिवाजी हे महान मराठा शासक मानले जात होते.
 
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वयाच्या 16 व्या वर्षी शिवाजीने तोरणा किल्ला आणि वयाच्या 17 व्या वर्षी रायगड आणि कोंढाणा किल्ले ताब्यात घेतले होते. 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुघलांशी पहिला सामना झाला ज्यामध्ये ते जिंकले. 1674 मध्ये मुघलांना पराभूत करून ते छत्रपती झाले आणि दक्षिणेकडे त्यांचे साम्राज्य पसरले.
 
एक उत्तम शासक, उत्तम राजे, मराठा साम्राज्याचे संस्थापक हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघणारे, एक शक्तिशाली, निष्ठावान, पराक्रमी, आपल्या जाज्वल्य पराक्रमाने इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कायम प्रत्येक भारतीयांच्या मनात सुवर्णाक्षरांनी आजतायगत कोरीव केले आहे आणि तसेच कायम राहील. 
 
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला !
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला
असा एक “मर्द मराठा शिवबा”होऊन गेला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Health Day 2023 जागतिक आरोग्य दिन माहिती