Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना: धारावी नियंत्रणात, केंद्राकडून ठाकरे सरकारचं कौतुक

कोरोना: धारावी नियंत्रणात, केंद्राकडून ठाकरे सरकारचं कौतुक
, मंगळवार, 23 जून 2020 (16:03 IST)
मुंबईत धारावीत गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनानं थैमान घातलं होतं. अखेर धारावीतल्या रुग्णवाढीचा दर नियंत्रणात आणण्यात महाराष्ट्र सरकारला यश मिळालंय. त्यामुळे केंद्र सरकारनेही ठाकरे सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप मारलीय. 
 
महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेनं धारावीत कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामाची केंद्र सरकारनं दखल घेत, कौतुक केलंय.
 
मे महिन्यात धारावीत रुग्णवाढीचा दर 4.3 टक्के होता. हाच दर आता म्हणजे जून महिन्यात 1.2 झाला आहे.
 
एवढंच नव्हे, तर धारावीतल्या कोरोनाग्रस्तांच्या दुपटीचा वेगही आता 78 दिवसांवर आलाय.
 
दाटीवाटीचा भाग असूनही मुंबई महापालिका आणि राज्य सरकारनं काँटॅक्ट ट्रेसिंग, कंटेनमेंट झोनचं काटेकोर पालन इत्यादी उपाययोजनांमधून धारावीत कोरोनाला नियंत्रित केलंय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हज यात्रा: कोरोनामुळे हज यात्रेची परनवानगी फक्त सौदी अरेबियांच्याच लोकांना