Publish Date: Fri, 04 Jun 2021 (14:54 IST)
Updated Date: Fri, 04 Jun 2021 (14:56 IST)
महराष्ट्रात मागच्या काही दिवसात कोरोनाची आकडेवारी कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती, परंतु आता रुग्णसंख्याल 15 हजाराच्या जवळ आली आहे. महाराष्ट्रातील अनलॉकबद्दल आज निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी आणखी एक बाब म्हणजे महाराष्ट्राचा पॉझिटिह्विटी रेट 6.37 टक्क्यावर आला आहे.
देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या नवीन घटनांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांत सकारात्मकतेचे दरही खाली आले आहेत. देशातील साप्ताहिक सकारात्मकतेचे प्रमाण 7.27 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. त्याचबरोबर, सक्रिय रुग्णांची संख्या (उपचार घेत असलेल्या लोकांची संख्या) 16.35 लाखांवर आली आहे. पुनर्प्राप्ती दर (पुनर्प्राप्त लोकांची संख्या) देखील वाढून 93.08 टक्क्यांवर गेली आहे. गुरुवारी तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 24,405 संक्रमण झाले, केरळमध्ये 18,853, कर्नाटकात 18,324 आणि महाराष्ट्रात 15,229 संसर्ग झाले. त्याच वेळी काल या चार राज्यात 1,434 मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील एकूण सक्रीय प्रकरणांपैकी निम्म्याहून अधिक (9.56 लाख प्रकरणे) या चार राज्यात आहेत. त्याचबरोबर, भारतात आतापर्यंत 22.41 कोटी लस डोस लागू केले गेले आहेत. ज्यामध्ये 4.56 कोटीहून अधिक लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. यात 18-44 वर्षे वयोगटातील 2.40 कोटी लोकांना प्रथम डोस देण्यात आला आहे आणि 86 हजारांहून अधिक लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.