Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंतप्रधानांनी त्यांच्या कठोर निर्णयांबद्दल देशवासीयांची माफी मागितली

पंतप्रधानांनी त्यांच्या कठोर निर्णयांबद्दल देशवासीयांची माफी मागितली
नवी दिल्ली , रविवार, 29 मार्च 2020 (12:48 IST)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले यामुळे मी देशवासियांची माफी मागतो. परंतु कठोर निर्णय घेणं ही, सध्या काळाची गरज आहे.’

दरम्यान, भारतात आतापर्यंत कोरोना बाधितांचा आकडा एक हजारांवर पोहोचला आहे. तर देशात कोरोनामुळे 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात असून महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना : एसबीआयच्या खात्यात पैसे जमा करा!