Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कांदे नवमी

कांदे नवमी
आषाढी शुध्द एकादशीपासून ते कार्तिकी शुध्द एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. चातुर्मास म्हणजे वर्षातले चार महिने, कांदा लसुण खाणं बंद करायचं. मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घेयचं म्हणून मोठी एकादशीपूर्वी अर्थात आषाढ शुद्ध नवमीला कांदे नवमी म्हणून साजरी करायची. खरं म्हणजे पावसाळ्यात कांदा सडल्या सारखा होतो, म्हणून चातुर्मासात वर्ज केलेला आहे तसेच वांगीदेखील वर्ज आहे.
आता या दिवशी काय करावे हा प्रश्न असेल तर भले ही कांदे वांगी चातुर्मासात चालू द्या पण यादिवशी कांदा भजी, कांद्याचे थालीपीठ, भरलेली वांगी हे पदार्थ तयार करून हा दिवस साजरा केला जाऊ शकतो.
 
हल्लीची पीढी हे सगळं अजिबात मानत नाही तरी एकेकाळी हे नियम प्रमाणिकपणे लागू व्हायचे. कोणच्याही घरातून कांदा, लसणाचा फोडणीचा घमघमीत वास येणे शक्यचं नव्हते. म्हणून यादिवशी भरपूर कांदे खाल्ले जायचे. मग विचार काय करायचा नियम पाळत नसला तरी होऊन जाऊ द्या कांद्याची भजी, थालीपीठे, झुणका वगैरे. आणि नियम पाळायचा असेल तर संपवा कांद्याचा स्टॉक.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकले तेव्हा त्यांच्या मनात आलेले विचार...