Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 24 March 2025
webdunia

चाणक्य नीती: जगात आहे फक्त चार मूल्यवान वस्तू, बाकी सर्व बेकार

चाणक्य नीती: जगात आहे फक्त चार मूल्यवान वस्तू, बाकी सर्व बेकार
आचार्य चाणक्य द्वारा सांगण्यात आलेल्या नीती आज देखील प्रभावी आणि सत्य साबीत होत आहे. आचार्य चाणक्याने ज्या नीती सांगितल्या आहे आणि जर व्यक्ती त्याचा योग्य प्रकारे पालन करेल तर त्याचे कल्याणच होईल. आजच्या युगात प्रत्येक मनुष्याला जास्त पैसे कमावायचे आहे आणि जास्तीत जास्त सुख भोगायचे आहे. कोणाला अकूत संपत्तीची इच्छा असते तर कोणाला मान-सन्मानाची, तसेच कोणी धावपळीच्या जीवनातून दूर मोक्ष प्राप्तीची इच्छा ठेवतो. 
 
जगात दानापेक्षा मोठी कुठलीच वस्तू नाही  
आचार्य चाणक्य ने सांगितले की या जगात भोजन आणि पाणीचे दानच महादान आहे. त्याशिवाय कुठलीही दुसरी वस्तू या जगात मौल्यवान नाही आहे. जो व्यक्ती गरिबाला भोजन आणि पाणी पाजतो तिच पुण्य आत्मा आहे. म्हणून दान जगातील चार सर्वश्रेष्ठ वस्तूंपैकी सर्वात मौल्यवान आहे.  
webdunia
दुसरी मौल्यवान वस्तू - द्वादशी तिथी  
आचार्य चाणक्याने हिंदू पंचांगातील बाराव्या तिथीला ज्याला आम्ही द्वादशी तिथी म्हणतो याला सर्वात पवित्र तिथी सांगितली आहे. द्वादशी तिथीच्या दिवशी पूजा-आराधना आणि उपास ठेवल्याने विष्णूची विशेष कृपा तुमच्यावर होते. द्वादशी तिथी विष्णूची प्रिय तिथी आहे.  
 
सर्वात शक्तिशाली मंत्र 
आचार्य चाणक्याने सांगितले की या जगात गायत्री मंत्रापेक्षा मोठे कोणतेही मंत्र नाही. गायत्रीला वेदमाता म्हणतात. चारी वेदांची उत्पत्ती गायत्रीहून झाली आहे.  
 
आई'पेक्षा मोठे दुसरे कोणी नाही  
आचार्य चाणक्यानुसार या पृथ्वीवर आई सर्वात मोठी आहे. आईपेक्षा मोठे कुठलेही देवता, तीर्थ आणि कोणतेही गुरू नाही. जी व्यक्ती आपल्या आई वडिलांची सेवा करतात  त्यांना अजून कोणाची भक्ती करण्याची गरज नसते.  
 
चाणक्य नीती श्लोक
नात्रोदक समं दानं न तिथी द्वादशी समा।
न गायत्र्या: परो मंत्रो न मातुदेवतं परम्।।

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चतुर्थीला गणपतीची पूजा करण्यापूर्वी हे नक्की बघा