Publish Date: Fri, 28 Nov 2025 (13:30 IST)
Updated Date: Fri, 28 Nov 2025 (13:36 IST)
मराठी लग्नपरंपरेतील 'मुहूर्त वडे' घालणे हा विधी लग्नाच्या तयारीची सुरुवात म्हणून केला जातो. यामध्ये वडे बनवण्यापूर्वी मुहूर्त साधून काही प्रक्रिया केल्या जातात. हा विधी मुख्यतः घरातील ज्येष्ठ स्त्रिया आणि सवाष्णी स्त्रिया मिळून करतात.
मुहूर्त वड्यांचे नंतर काय करतात?
मुहूर्त वडे घालण्याचा विधी पूर्ण झाल्यावर, जे वडे बनवले जातात, ते देवतेला नैवेद्य म्हणून दाखवले जातात. त्यानंतर ते वडे कुटुंबीय आणि सोहळ्यात उपस्थित असलेल्या पाहुण्यांना वाटले जातात किंवा जेवण म्हणून दिले जातात. हा आनंदाचा आणि तयारीच्या सुरुवातीचा भाग असतो, त्यामुळे ते वडे सर्वांनी मिळून खाणे शुभ मानले जाते.
सवाष्णीचा मान: ज्या सवाष्णींनी वडे बनवण्याच्या विधीत सहभाग घेतला असतो, त्यांना जेवणात आवर्जून हे वडे दिले जातात आणि त्यांचा मान-सन्मान केला जातो.
काही परंपरांमध्ये, मुहूर्त वडे वाळवून ठेवले जातात. नंतर ग्रहमख अर्थात ग्रहयज्ञ किंवा घरचे गडगनेर (केळवण) या दिवशी स्वयंपाकात वापरले जातात. अनेक लोक पातलभाजीत हे मिसळतात. किंवा घरगुती स्वयंपाक केला जाणार असेल त्यात याचा समावेश वडे, घावन किंवा धिरडे तयार करताना केला जातो.
'मुहूर्त वडे' हा आनंद, सहभाग आणि शुभकार्याच्या सुरुवातीचे प्रतीक आहे. त्यामुळे बनवलेले वडे नैवेद्य आणि प्रसाद म्हणून सर्वांनी मिळून खाल्ले जातात. थोडक्यात मुहूर्त वडा हा विधी लग्नाची तयारी आणि शुभकार्याची सुरुवात दर्शवतो. या विधीनंतर बनवलेले वडे प्रसाद म्हणून वाटले जातात आणि आनंद साजरा केला जातो.