Publish Date: Fri, 23 Dec 2016 (08:51 IST)
Updated Date: Fri, 23 Dec 2016 (12:59 IST)
अरबी समुद्रात उभारण्यात येणार्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी नाशिक येथून गोदावरीचे पवित्र जल तसेच जिल्ह्यातील गड किल्ल्यांची माती मुंबईकडे पाठविण्यात आली.याकरिता विविध जिल्ह्यातील नद्यांचे जल आणि गड, किल्ल्यांची माती मागविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या वतीने रामकुंड येथे जलपूजन करण्यात येऊन जलकलशाची मिरवणूक काढण्यात आली.त्याच बरोबर राज्यातील जळगाव धुळे नंदुरबार अंग्पूर आणि अनेक महत्वाच्या जिल्हे येथून हे पवित्र जल आणि मृदा या पुजेकरिता पाठवली आहे. तर मुंबई येथे यासर्व माती आणि पाण्याचे पूजन होणार आहे.
webdunia
Publish Date: Fri, 23 Dec 2016 (08:51 IST)
Updated Date: Fri, 23 Dec 2016 (12:59 IST)