Publish Date: Tue, 28 Dec 2021 (12:15 IST)
Updated Date: Tue, 28 Dec 2021 (12:18 IST)
भारतात 5G ची चाचणी गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे आणि मे 2022 पर्यंत देशात 5G चाचणी चालेल. संपूर्ण देश 5G च्या कमर्शिअल लॉन्चची वाट पाहत आहे परंतु अद्याप कोणतेही अधिकृत विधान दिले गेले नाही. आता दूरसंचार विभागाने म्हटले आहे की मेट्रो आणि मोठ्या शहरांमध्ये 5G प्रथम लॉन्च केला जाईल. दूरसंचार विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की 5G प्रथम गुरुग्राम, बेंगळुरू, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे या मोठ्या शहरांमध्ये लाँच केले जाईल आणि हे लॉन्च चाचणीच्या आधारावर होणार नाही, तर एक व्यावसायिक आधारावर केले जाईल. सध्या व्होडाफोन आयडिया, जिओ आणि एअरटेल या शहरांमध्ये त्यांच्या 5G नेटवर्कची चाचणी घेत आहेत.
गेल्या दोन वर्षांत भारतीय बाजारपेठेत 100 हून अधिक 5G स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले आहेत. याशिवाय, इतर 5G उपकरणे देखील बाजारात आहेत. आता फक्त 5G लॉन्च होण्याची प्रतीक्षा आहे. स्मार्टफोन निर्मात्यांनी आता 4G फोन लाँच करणे जवळपास बंद केले आहे.