Publish Date: Tue, 18 Feb 2020 (11:57 IST)
Updated Date: Tue, 18 Feb 2020 (12:00 IST)
जगातील आघाडीची टेक कंपनी गूगल (Google)ने रेल्वे स्थानकात उपलब्ध नि: शुल्क वाय-फाय सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. दूरसंचार बाजारात कमी किंमतींसह डेटा योजना उपलब्ध असल्याने कंपनीचे म्हणणे आहे की 400 हून अधिक स्थानकांवर नि: शुल्क वायफाय सेवा बंद केली जात आहे. त्यामुळे लोकांना विनामूल्य वाय-फाय सेवा देण्याची आवश्यकता नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचण्यासाठी गूगलने भारतीय रेल्वेच्या सहकार्याने ही योजना सुरू केली होती.
गूगलचे म्हणणे आहे की इंटरनेट स्वस्त झाले
गूगलने आपल्या अधिकृत ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, भारतातील इंटरनेट पूर्वीपेक्षा कितीतरी किफायतशीर झाली आहे. तसेच, प्रत्येक माणूस सहजपणे इंटरनेटचा वापर करतो. या व्यतिरिक्त ट्रायने गेल्या पाच वर्षांत डेटा प्लॅनच्या किमतीत 90 टक्क्यांनी कपात केली आहे.
भारतीय ग्राहक 10 जीबी डेटा वापरतात
मीडिया रिपोर्टनुसार सध्या भारतीय ग्राहक दरमहा सुमारे 10 जीबी डेटा वापरतात. दुसरीकडे, तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की येत्या काही वर्षांत ही आकडेवारी 10 जीबी वरून 20 जीबीपर्यंत वाढेल.
Google वाय-फाय प्रोग्राम पूर्णपणे बंद करणार नाही
भारतातील वायफाय कार्यक्रमाच्या यशाकडे पाहता गूगलने अन्य देशांमध्येही याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता ही कंपनी भारतात ही योजना बंद करणार आहे. तथापि, Google हळूहळू ही योजना बंद करेल.
2015 मध्ये वाय-फाय योजना सुरू केली
Google ने 2015 मध्ये विनामूल्य वाय-फाय योजना सुरू केली होती. यासाठी कंपनीने भारतीय रेल्वे आणि रेलटेलबरोबर भागीदारी केली होती. त्याचबरोबर 400 हून अधिक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना विनाशुल्क वायफाय सेवा दिली जात आहे.