Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सरकारकडून जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणला जातोय- जयराम रमेश

jayram ramesh
, मंगळवार, 4 जून 2024 (17:17 IST)
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून दावा केलाय की उत्तर प्रदेशातील जिल्हाधिकाऱ्यांवर मतमोजणी दरम्यान दबाव आणला जातोय.
 
त्यांनी ट्विट मध्ये म्हटलंय की, "उत्तर प्रदेशातील महाराजगंज, बांसगाव, मेरठ, मुझफ्फरनगर या जागा निवडून याव्याl यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून दबाव टाकला जातोय."
 
जयराम रमेश यांनी लिहिलंय की, "प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं की सरकार बदलत राहतं त्यामुळे लोकशाहीचा हा खेळ मान्य केला जाणार नाही." निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 4.12 पर्यंत उत्तर प्रदेशातील एकूण 80 जागांपैकी एनडीए 35, समाजवादी पार्टी 34 आणि काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ओडिशा, आंध्र प्रदेशात सरकार बदलण्याचे संकेत