Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महापुरामुळे विधानसभा निवडणूक पुढे ढकला : राज ठाकरे

महापुरामुळे विधानसभा निवडणूक पुढे ढकला : राज ठाकरे
, शनिवार, 10 ऑगस्ट 2019 (16:55 IST)
महापुरासारखी घटना घडली तरीही हे सरकार दुर्लक्ष करतं आहे. राजकारण एके राजकारण करत बसायचं हेच या सरकारचं काम आहे अशीही खरमरीत टीका राज ठाकरे यांनी केली आहे. जी भीषण स्थिती आहे त्यातून सावरण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.
 
सांगली आणि कोल्हापूरमध्ये एवढी भीषण परिस्थिती निर्माण झालेली असताना यात्रांची नाटकं कसली सरकारकडून केली जात आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्या झाल्या तिथे लष्कर का पाठवलं नाही? जे नुकसान झालं आहे ते भरुन यायला, माणसं स्थिर व्हायला वेळ लागणार आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणूक येते आहे. ती पुढे ढकलावी अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. तसंच आपण यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सध्या अलमट्टीतून ५ लाख ३० हजार वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु