Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठा आरक्षण : केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली

मराठा आरक्षण : केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली
, शुक्रवार, 2 जुलै 2021 (07:50 IST)
मराठा आरक्षणासंदर्भात ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा कायदा रद्द ठरवला. त्यानंतर केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. १०२व्या घटनादुरुस्तीनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास अर्थात SEBC मध्ये नव्या प्रवर्गांचा समावेश करण्याचा किंवा नवे प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नसल्याच्या आपल्या आधीच्या भूमिकेवरच सर्वोच्च न्यायालय ठाम आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एल. नागेश्वरा राव, न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
 
सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा रद्दबातल ठरवत मराठा आरक्षणच रद्द केलं. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या तीव्र नाराजीचा सामना राज्य सरकारला सहन करावा लागला. राज्यघटनेच्या १०२व्या घटनादुरुस्तीनुसार एसईबीसीचे नवे प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देणारा राज्य सरकारने केलेला कायदा रद्द ठरवला. आरक्षणाचं प्रमाण ५० टक्क्यांच्या वर जाण्याचा मुद्दा देखील या सुनावणीमध्ये महत्त्वाचा ठरला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रवीण परदेशी यांनी काही तासांतच दिला नव्या पदाचा राजीनामा