rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

..... तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही?; अशोक चव्हाण यांचा सवाल

question of Maratha reservation
, शनिवार, 31 ऑक्टोबर 2020 (08:01 IST)
देशात कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही?; असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. अशोक चव्हाण  परभणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठकित बोलत होते. 
 
या बैठकीला संबोधित करताना त्यांनी हा सवाल केला. या देशात कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही? मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटण्यासाठी दिल्लीतील नेत्यांनी सकारात्मकता दाखवली पाहिजे, अशी आशा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
 
मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप होत आहे. मुळात हा आरोप राजकीय आहे. भाजपवाले यात विषयात घुसले असून त्यांनीच मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नसल्याची बोंब उठवली आहे. खरे तर सरकार मराठा आरक्षणावर गंभीर असून कामही करत आहे. हा प्रश्न खंडपीठाकडे ठेवून चालणार नाही. तो घटनापीठाकडे असावा, असं आमचं म्हणणं होतं, असंही त्यांनी सांगितलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्राप्रमाणे अमेरिकेतही परिवर्तन होणार, रोहित पवार यांचे ट्विट