Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रघुराम राजन यांनी देश सोडून शिकागोला जावं!

रघुराम राजन यांनी देश सोडून शिकागोला जावं!
दिल्ली , शुक्रवार, 13 मे 2016 (11:36 IST)
रिझर्व्ह बँकेच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशाचं नुकसान झालं आहे, त्यामुळं रघुराम राजन यांनी शक्य तेवढ्या लवकर देश सोडून शिकागोला जावं, असं वक्तव्य राज्यसभेतील भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. राजन यांचं धोरण देशाच्या अर्थव्यवस्थेला अनुकूल नाही. बँकेने वाढवलेल्या व्याजदरांमुळेच उद्योग तोट्यात गेले असल्याचं स्वामी यांचा आरोप आहे. राजन यांनी 5 सप्टेंबर 2013 साली भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची धुरा सांभाळली होती. येत्या सप्टेंबर महिन्यात त्यांचा गव्हर्नरपदाचा कार्यकाळ संपणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

थीम पार्कमध्ये पाळणा कोसळून एकाचा मृत्यू