Publish Date: Wed, 08 Jun 2022 (11:33 IST)
Updated Date: Tue, 18 Oct 2022 (23:38 IST)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने सर्वसामान्यांना आणखी एक झटका दिला आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर केली आहे. रेपो रेट 4.40 टक्क्यांवरून 4.90 टक्के करण्यात आल्याचे दास यांनी म्हटले आहे. RBI च्या पतधोरण बैठकीनंतर गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ही घोषणा केली आहे.
म्हणजेच आता एका महिन्यात रेपो दरात 90 बेसिस पॉइंट्सची वाढ झाली आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर गृहकर्जापासून ते कार कर्ज आणि शैक्षणिक कर्ज महागणार हे निश्चित आहे. दुसरीकडे, ज्यांनी आधीच गृहकर्ज घेतले आहे, त्यांचा ईएमआय अधिक महाग होईल.
RBI गव्हर्नरांनी वाढत्या महागाईवर चिंता व्यक्त केली आहे. कोविड महामारीनंतर आरबीआय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पावले उचलत राहील. त्यांनी म्हटले आहे की जागतिक आर्थिक क्रियाकलाप आणि गती मंदावली आहे आणि त्याचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून येत आहे. देशात महागाईचा दबाव वाढत आहे.कमोडिटी मार्केटमध्येही घट झाली आहे.मौद्रिक धोरणाचे नियम पुस्तक चालत नाही.