Publish Date: Mon, 10 Jun 2024 (08:06 IST)
Updated Date: Mon, 10 Jun 2024 (08:09 IST)
T20 विश्वचषक 2024 च्या 19 व्या सामन्यात भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होत होता. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 119 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 113 धावाच करू शकला.
भारताने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 19 षटकांत 119 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ मजबूत स्थितीत दिसत होता. एकवेळ 14व्या षटकात पाकिस्तानची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 80 धावा होती. यानंतर सामन्याला कलाटणी मिळाली. रिझवान-शादाब बाद झाले. जसप्रीत बुमराह 19व्या षटकात गोलंदाजीला आला आणि त्याने केवळ तीन धावा देत इफ्तिखारची विकेट घेतली. 20व्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 18 धावांची गरज होती.
मात्र, अर्शदीपने केवळ 11 धावा देत इमाद वसीमची विकेट घेतली. अशा प्रकारे टीम इंडियाने अशक्य गोष्टीला शक्य मध्ये बदलले. टीम इंडियाचा पराभव निश्चित वाटत होता, पण बुमराह-अर्शदीप, सिराज आणि हार्दिकच्या वेगवान गोलंदाजीच्या चौकडीने भारताला विजय मिळवून दिला. पाकिस्तान संघाला 20 षटकांनंतर 7 बाद 113 धावा करता आल्या. भारताकडून बुमराहने तीन विकेट घेतल्या आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. तर हार्दिकने दोन विकेट घेतल्या. तर अर्शदीप आणि अक्षर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.