Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IND vs SA 3rd T20I: विराट कोहली पुढचा सामना खेळणार नाही, या खेळाडूंना संधी मिळू शकते

virat kohali
, सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (19:40 IST)
IND vs SA 3rd T20I भारताचा फलंदाज विराट कोहलीला मंगळवारी दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे.विराट आता पुढचा सामना खेळणार नाही.भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना मंगळवारी इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर पहिल्यांदा टी-20 मालिका जिंकल्यानंतर टीम मॅनेजमेंटने विराटला कामाचा ताण पाहता विश्रांती दिली आहे.भारतीय संघ तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे.विराटने दुसऱ्या T20 मध्ये नाबाद 49 धावा केल्या होत्या आणि भारताने हा सामना 16 धावांनी जिंकला होता.विराटच्या अनुपस्थितीत आता बेंचवर बसलेल्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.
 
T20 विश्वचषकापूर्वी भारत मंगळवारी शेवटचा सामना खेळणार आहे.आशिया चषकापासून कोहलीने भारताचे सर्व सामने खेळले आहेत.त्याने 10 डावात 141.75 च्या स्ट्राईक रेटने 404 धावा केल्या आहेत.यामध्ये त्याने तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे.कोहली आता T20 वर्ल्ड कपमध्ये थेट भारताकडून खेळणार आहे, जिथे टीम इंडियाला 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. 

कोहली शिवाय केएल राहुललाही तिसर्‍या टी-20मधून ब्रेक दिला जाऊ शकतो. राहुलही झिम्बाब्वे दौऱ्यापासून सतत क्रिकेट खेळत आहे. अशा स्थितीत त्यांनाही विश्रांती देऊन संघ व्यवस्थापन नव्या खेळाडूला आजमावू शकते. राहुलला विश्रांती दिल्यास अष्टपैलू शाहबाज अहमदचा संघात समावेश केला जाऊ शकतो. असे झाल्यास तो टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करेल. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मासोबत सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत या दोघांना सलामीसाठी पाठवले जाऊ शकते.दीपक हुडाच्या दुखापतीमुळे संघात घेतलेल्या श्रेयस अय्यरला कोहलीच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.
 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चे संकेत गिरीश महाजन यांनी दिले