Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोहली भारतासाठी 63 वेळा सामनावीर ,हा पुरस्कार जिंकणारा एकमेव खेळाडू

कोहली भारतासाठी 63 वेळा सामनावीर ,हा पुरस्कार जिंकणारा एकमेव खेळाडू
, मंगळवार, 14 मार्च 2023 (23:36 IST)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना अनिर्णित राहिला. टीम इंडियाने ही मालिका 2-1 अशी आपल्या नावावर केली. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. त्याने 364 चेंडूत 186 धावांची शानदार खेळी केली. कसोटीत कोहलीने शतक झळकावून1205 दिवसांचा दुष्काळ संपवला. यापूर्वी त्याने नोव्हेंबर 2019 मध्ये कसोटीत शतक झळकावले होते. या शतकामुळे कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते
 
कोहलीचे हे कसोटीतील 28वे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75वे शतक होते. या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. हा पुरस्कार मिळवण्यासोबतच कोहलीने एक खास कामगिरीही आपल्या नावावर केली. तीनही फॉरमॅटमध्ये 10 किंवा त्याहून अधिक वेळा हा पुरस्कार मिळवणारा तो एकमेव खेळाडू आहे. तिन्ही फॉरमॅट्ससह, कोहलीने एकूण 63 वेळा सामनावीर (POTM) पुरस्कार जिंकला आहे. कोहलीला हा मान 10 वेळा कसोटीत मिळाला आहे. 
 
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत कोहलीने प्रथमच सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. याशिवाय त्याने या फॉरमॅटमध्ये तीन वेळा इंग्लंडविरुद्ध, दोनदा दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेविरुद्ध आणि एकदा न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध हा पुरस्कार पटकावला आहे. कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये 38 वेळा आणि टी-20मध्ये सर्वाधिक 15 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. वनडेमध्ये कोहली 13 वेळा वेस्ट इंडिजविरुद्ध आणि सात वेळा श्रीलंकेविरुद्ध सामनावीर ठरला आहे.
 
T20 मध्ये 15 पैकी चार वेळा त्याने पाकिस्तानविरुद्ध हा पुरस्कार पटकावला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वेळा हा मान मिळवला. कोहली पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात दोनदा सामनावीर ठरला आहे. अशा प्रकारे त्याने पाकिस्तानविरुद्ध एकूण सहा वेळा हा पुरस्कार पटकावला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत कोहलीने पहिल्यांदाच हा मान मिळवला आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने कांगारूंविरुद्ध आठ शतके झळकावली आहेत. 
 
 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जुन्या पेन्शन योजनेवरुन संप; मेस्मा कायद्याची मुदत वाढवली