Publish Date: Mon, 24 Sep 2018 (14:57 IST)
Updated Date: Mon, 24 Sep 2018 (15:03 IST)
पाक टीम हरली आणि त्यांच्या देशात टीकेचा तर आपल्या देशात चेष्टेचा विषय झाली आहे. नेटकरी वर्गाने तर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे पाक टीम ट्रोल झाली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याने आशिया कप २०१८ मध्ये पुन्हा एकदा क्रीडारसिकांची मनं जिंकली आहे. भारतीय संघाच्या विजयामुळे रविवारची फलद्रूप झाली होती. आपल्या देशाचे रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या फटकेबाजीच्या बळावर संघाने पाकिस्ताविरोधातील दुसरा सामना जिंकला आहे व आशिया कप २०१८ या मालिकेत विजयाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकल आहे. शोहेब मलिक वगळता एकही पाकिस्तानच्या संघातून कोणत्याच फलंदाजाला खेळपट्टीवर तग थांबू शकला नाही. मलिकच्या संघाने २३८ धावांचं आव्हान त्यांनी भारतासमोर ठेवलं आणि 'रो हिटमॅन'ने शिखरच्या साथीने ते आव्हान अगदी सहजपणे स्वीकारल होते. सोशल मीडियावर अवघ्या काही क्षणांमध्येच या सामन्यातील विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक करण्यात आलं. त्यातच काही नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या पराभवानंतर त्यांची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली.
Rosy
@rose_k01
Pakistani Fans waiting for their Team to win any match against India