Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बीसीसीआयने आयपीएलसाठी कडक बायो-बबल केले, मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल

बीसीसीआयने आयपीएलसाठी कडक बायो-बबल केले, मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल
, सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (13:18 IST)
आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळला जाईल.आयपीएलचा पहिला टप्पा भारतात खेळला गेला, पण कोविड -19 च्या वाढत्या प्रकरणामुळे ते मध्यंतरी स्थगित करावे लागले. पण ते आता यूएईमध्ये हलवण्यात आले आहे.याआधी 2020 मध्ये आयपीएल यूएईमध्ये खेळले गेले होते.दुसऱ्या टप्प्यापूर्वी बीसीसीआयने आरोग्याशी संबंधित नियम जारी केले आहेत. बायो-बबल तोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. 
 
पीटीआयच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआयने म्हटले आहे की,"जर आयपीएल फ्रँचायझीचा कोणताही सदस्य किंवा कोणत्याही खेळाडूचे नातेवाईक बायो बबल तोडतात तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल." आयपीएलचा पहिला टप्पा कोरोनामुळे पुढे ढकलावा लागला असल्याने, बीसीसीआय यावेळी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू इच्छित नाही. 
 
पीटीआयच्या अहवालानुसार, कोणताही आंतरराष्ट्रीय खेळाडू जो एका बबलमधून आयपीएल बबलमध्ये येतो, तेव्हा त्याला क्वारंटाईन करण्याची गरज भासणार नाही. पण जर कोणी बबल  तोडून आयपीएलच्या बायो बबलमध्ये येऊ इच्छित असेल तर त्याला 6 दिवस क्वारंटाईन करावे लागेल.आयपीएलचा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक ! अल्पवयीन प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केली