Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोमनाथ मंदिराचा इतिहास, गझनीच्या महमूदाची स्वारी आणि संपत्तीची लूट

gajhani
, शुक्रवार, 14 जून 2024 (11:57 IST)
बऱ्याच इतिहासांच्या पुस्तकात आपल्याला सोमनाथ मंदिराचा इतिहास वाचायला मिळतो. त्यात असं म्हटलेलं असतं की, गझनीच्या महमूदने सोमनाथ मंदिरावर छापा टाकून तेथील मौल्यवान खजिना लुटला. गुजरातमधील सोलंकी राजासाठी तो मोठा संकटाचा काळ होता. एक हजार वर्षांपूर्वी, सोमनाथ ही गुर्जर राज्याची धार्मिक राजधानी मानली जात होती. असं मानलं जातं की, सौराष्ट्राच्या किनाऱ्यावर मंदिर असल्यामुळे या मंदिराला सोमनाथ हे नाव मिळालं. सौराष्ट्राच्या किनाऱ्यावर बांधलेल्या या मंदिराच्या भिंती समुद्राच्या लाटांनी वाहून नेल्या. हे मंदिर मोठ्या दगडी शिळेवर बांधलेलं आहे. या मंदिराचं छत आफ्रिकेतून आयात केलेल्या 56 खांबांवर उभं आहे. मंदिराच्या शिखरावर 14 सोन्याचे कळस होते. जेव्हा सूर्य उगवायचा तेव्हा ते चमकायचे आणि दूर अंतरापर्यंत दिसायचे.
 
मंदिरात बसवलेलं शिवलिंग सात हात उंच होतं. त्यावर विविध प्राण्यांच्या प्रतिमा कोरल्या होत्या. शिवलिंगाला सजवण्यासाठी हिरेजडित मुकुट वापरला जायचा. भगवान शिवाच्या सेवकांचे प्रतीक म्हणून गर्भगृहाजवळ छतावर सोन्या-चांदीच्या अनेक मूर्ती होत्या. गर्भगृहात रत्नजडित झुंबर लटकवलेले होते. समोर एक मोठी सोनसाखळी लटकलेली होती. मंदिराला लागूनच रत्न, सोन्या-चांदीच्या मूर्तींनी भरलेले भांडार होतं. डॉ. मुहम्मद नाझिम यांच्या 'द लाइफ अँड टाइम्स ऑफ सुलतान महमूद ऑफ गझनी' या पुस्तकात या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. इस्लामिक विद्वान अल बैरुनी आणि इब्न जाफिर यांच्या गोष्टींचा हवाला देत लुटीच्या आधी सोमनाथ मंदिर कसं होतं याचं वर्णन केलेलं आहे.
 
webdunia
सोमनाथ मंदिर
शंभूप्रसाद हरिप्रसाद देसाई यांनी 'प्रभास याने सोमनाथ' या पुस्तकात सोमनाथ मंदिराचं वर्णन केलेलं आहे. सोमनाथ मंदिर आरशाने झाकलेल्या 56 लाकडी खांबांवर बांधलेले होतं. आतल्या खोलीत मूर्तीची स्थापना करण्यात आली. ही मूर्ती गोलाकार पाच हात उंच आणि जमिनीखाली दोन हात खोल होती. खोली दिव्यांनी उजळलेली असायची. मूर्ती सोन्याची साखळी आणि घंटांनी सजलेली होती. रात्री ठराविक वेळी ही साखळी हलायची आणि घंटा वाजवली जायची. मंदिरात अनेक सोन्याच्या मूर्ती होत्या. त्यावर अत्यंत मौल्यवान रत्नांनी जडवलेली जावनिका होती. सोमनाथाची मूर्ती सर्व भारतीय मूर्तींपैकी सर्वोत्तम आहे. पुनर्जन्माच्या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे हिंदू असं मानायचे की 'शरीर सोडल्यानंतर आत्मा' सोमनाथाची पूजा करण्यासाठी येते. इथे भाविक आपल्या मौल्यवान वस्तू अर्पण करतात. मंदिराच्या देखभालीसाठी हजारो गावं देण्यात आली होती. मंदिर अतिशय आकर्षक आणि मौल्यवान रत्नजडीत असं होतं. मंदिरातील मूर्तींची पूजा करण्यासाठी आणि यात्रेकरूंसाठी एक हजार ब्राह्मण येथे राहत असत. यात्रेकरूंचे मुंडन करण्यासाठी 300 नभिकांची सोय होती असं पुस्तकात सांगितलं आहे. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी प्राथमिक संशोधन करणारे इतिहासकार रत्नमणी राव भीमराव यांनीही आपल्या पुस्तकात बरंच काही लिहिलं आहे. अकराव्या शतकाच्या पूर्वार्धात सोमनाथची कीर्ती भारतात पसरली होती. सोमनाथची कीर्ती देशभर पसरली होती. सोमनाथाची संपत्तीही प्रचंड होती. त्यामुळे महमूदने सोमनाथाच्या प्रसिद्धी आणि संपत्तीवर डोळा ठेवला.
 
सल्तनतचा विस्तार
तो काळ असा होता जेव्हा तलवारीच्या जोरावर जगाच्या सीमा ठरवल्या जात. मार्च 998 मध्ये अफगाण भूमीवर गझनीच्या मैदानावर दोन भाऊ आपापसात भिडले. गझनीच्या महमूदने दिवसा युद्ध जिंकले आणि संध्याकाळी सिंहासनावर बसला. महमूद सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर त्याने 'सुलतान' ही पदवी धारण केली. ही पदवी धारण करणारा तो जगातील पहिला सम्राट होता. तो मुस्लिम खलिफाला समतुल्य मानला जातो. गझनीच्या गादीवर बसल्यानंतर सुलतानाने आपल्या राज्याच्या (सल्तनत) सीमा वाढवण्याचा निर्णय घेतला. उत्तरेकडील मध्य आशियापासून दक्षिणेकडील सिंधूपर्यंत त्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. महमूद तत्कालीन हिंदुस्थानचे अनेक भाग जिंकले. तेथील मंदिरे उद्ध्वस्त केली.
 
सोमनाथकडे प्रयाण
महमूद आता सोमनाथच्या दिशेने जायचे ठरवले. 18 ऑक्टोबर 1025 रोजी त्याने 30,000 सैनिकांसह सोमनाथकडे कूच केली. मात्र, इतिहासाच्या पुस्तकात या सैनिकांची संख्या वेगळी आहे. रत्नमनी यांनी त्यांच्या पुस्तकात 54,000 पगारदार आणि 30,000 धार्मिक सैनिक सोमनाथकडे कूच करू लागल्याचं लिहिलं आहे. अरब इतिहासकार अली इब्न अल-अथिर यांच्या मते, महमूद गझनीपासून सौराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत 1,420 किलोमीटरचा प्रवास करून 6 जानेवारी 1026 रोजी गुजरातमधील सोमनाथला पोहोचला.
 
सोमनाथमधील वादळी वारे
गझनीपासून सोमनाथ असा प्रवास करेपर्यंत महमूद फारसा अडथळा आला नाही. मात्र नंतर त्याला ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं याचं वर्णन संभूप्रसाद देसाई यांनी त्यांच्या पुस्तकात केलं आहे. मलवपती मुंज, भोज परमार, चेदिराजा कर्ण, सिंध राजे यांच्याशी लढणारा अनहिलवाड पाटण राज्याचा राजा भीम देव महमूदच्या प्रचंड सैन्याला घाबरत होता. भीमदेवाच्या कच्छला जाण्याने महमूदचा मार्ग मोकळा झाला. मोढेरा येथे पोहोचल्यावर महमूदने पहिले मोठे आव्हान पेलले. मोढेरा येथील 20 हजार सैनिकांनी सुलतानवर हल्ला केला. डॉ. नाझिम यांनी "द लाइफ अँड टाइम्स ऑफ सुलतान मुहम्मद ऑफ गझना" मध्ये लिहिलंय सुलतानने युद्ध जिंकलं. शंभूप्रसाद देसाई अरब इतिहासकार अल-इब्न अल-अथिर यांचा हवाला देऊन लिहितात की, सैनिकांनी सेनापतीशिवाय लढा दिला. मोढेराची लढाईही संपुष्टात आल्याने सोमनाथवर स्वारी करणं महमूदला सोपं झालं.
 
हिंदूंची एकजूट
डॉ. नाझीम यांच्या मते, किनाऱ्यावर एक मोठा किल्ला होता, ज्याच्या भिंतीवर मोठ्या संख्येने ब्राह्मण जमले होते.भारतीय देवतांचा अपमान करणाऱ्या सुलतानाचा नाश करण्यासाठी 'सोमेश्वर'ने त्याला सोमनाथ इथे आणलंय असा विश्वास या गटाला होता. रत्नमणी राव यांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या दिवसाच्या लढाईत महमूदचे अनेक सैनिक मारले गेले आणि दुसऱ्या दिवशीही असंच घडलं. गड चढण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. डॉ. नाझीम यांच्या म्हणण्यानुसार, '7 जानेवारीला सकाळी लोक महमूदच्या सैन्याचा प्रतिकार करू शकले नाहीत आणि त्यांनी माघार घेतली. त्याच दुपारनंतर महमूदचे सैनिक किल्ल्यावर पोहोचले. 'किल्ला सैन्याच्या ताब्यात आल्याने सोमनाथच्या रहिवाशांनी मंदिर गाठले आणि सोमनाथाच्या मूर्तीची प्रार्थना केली.' नंतर हिंदूंनी महमूदच्या सैन्यावर हल्ला केला. संध्याकाळी त्यांनी महमूद सैन्याला पांगवले आणि ताबा घेतलेल्या स्थानांवरून हुसकावून लावले. तिसऱ्या दिवशी महमूदच्या सैन्याने दोनदा हल्ला करून किल्ला ताब्यात घेतला. इब्न अल-अथिरच्या म्हणण्यानुसार, किल्ला ताब्यात घेतल्यानंतर, स्थानिक गट सोमनाथच्या मंदिराजवळ आले. तिथे त्यांनी पुन्हा महमूदच्या सैनिकांवर हल्ला केला. मात्र, महमूदच्या सैन्याला फार काळ प्रतिकार करावा लागला नाही. रत्नमणी राव लिहितात की, महमूदला युद्ध लवकरात लवकर संपवून गझनीला परत जायचं होतं. 'प्रभास-सोमनाथ' या पुस्तकातील रत्नमणी रावांच्या मते, महमूदने आपल्या सैन्यात एक लहानसे सैन्य उभे केले आणि त्यातील एकाला किल्ल्यावर तैनात केले. आजूबाजूच्या भागातून 'सोमनाथच्या सैनिकांना' मदत पोहोचू नये म्हणून इतर तुकड्या पाठवण्यात आल्या. दरम्यान महमूदला कळलं की, भीमदेव लष्करी ताकद गोळा करत आहे आणि हल्ला करायला येत आहे, म्हणून तो स्वतः त्या मार्गाने गेला. भीमदेव आणि महमूद यांच्यात घनघोर युद्ध झाले. त्यानंतर भीमदेव पुन्हा पळून गेला. त्या लढाईनंतर महमूद सोमनाथला परत आला आणि त्याने किल्ला नष्ट केला. इब्न जफिरच्या म्हणण्यानुसार, सोमनाथला वाचवण्याच्या प्रयत्नात किमान 50 हजार भाविकांनी प्राण गमावले. सोमनाथाच्या मंदिराचा खजिना लुटल्यानंतर महमूदने बाकी सर्व जाळण्याचा आदेश दिला. अली इब्न अल-अथिर यांच्या मते, मंदिराच्या लुटीमुळे सुलतानला 20 लाख दिनार मिळाले.
 
'द लाइफ अँड टाइम्स ऑफ सुलतान मुहम्मद ऑफ गझना' नुसार, महमूदला मिळालेले दिनार एकूण लूटीच्या केवळ एक पंचमांश होते. पण इथे हे लक्षात घ्यायला हवं की, लुटलेल्या खजिन्याची किंमत सांगणारा हा ग्रंथ 1931 साली लिहिला गेला होता. 'सोमनाथ किंवा सौराष्ट्रात गझनीशी युद्ध करणारा दुसरा राजा नव्हता. मोढेरा येथे वीस हजार 'योद्धा' मरण पावले. मात्र, सोमनाथमधील खजिना मिळाल्यानंतर महमूदला वेळ वाया घालवायचा नव्हता.
 
चोरून गझनी पळून गेला
सर हॅरॉल्ड विल्बरफोर्स-बॉल यांनी लिहिलेल्या 'हिस्ट्री ऑफ काठियावाड फ्रॉम द अर्लीएस्ट टाइम्स' नुसार, खजिना सापडताच मुहम्मदने तो लवकरात लवकर सौराष्ट्रातून नेण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान तो भीमदेवावर हल्ला करण्यासाठी कच्छला गेला. मात्र, हा हल्ला गझनीने जिंकला की नाही हे स्पष्ट नाही. 'प्रभास याने सोमनाथ' या पुस्तकानुसार, महमूदने सोमनाथावर हल्ला करून हिंदू राजांना धक्का दिला. माळव्याचा राजा भोज परमार, सांभरवाचा विशालदेव चौहान आणि पाटणचा भीम सोलंकी यांनी महमूदने युद्धाची रणनीती आखली. त्यावेळी महमूदकडे गझनी राज्यात परतण्याचा एकच मार्ग शिल्लक राहिला होता. राजाभोज मालवणाच्या मार्गावर लढाईसाठी सज्ज होता, विशालदेव चौहान अबूसाठी तयार होता. मुहम्मद कच्छला गेल्यास त्याचा मार्ग रोखण्यासाठी भीमदेवच्या सैन्याने चांगली तयारी केली होती. पण महमूदने वाळवंटाचा मार्ग निवडला. त्याला राजाच्या हालचालींची नियमित माहिती मिळत होती. 'प्रभास-सोमनाथ' या पुस्तकानुसार, महमूद ज्या मार्गाने आला होता त्याच मार्गाने तो राज्यात परत गेला नाही. कच्छच्या वाळवंटातून सिंधपर्यंत गेला. भीमदेव हा तीन राजांपैकी सर्वात कमी शक्तीशाली होता आणि त्याचे राज्य महमूदच्या मार्गात होते. लुटलेली संपत्ती घेऊन गझनीला जाणं सोपं नव्हतं हे जाणून गझनीने भीमदेव असलेल्या किल्ल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 'द लाइफ अँड टाइम्स ऑफ सुलतान महमूद ऑफ गझनी' नुसार भीमदेवला महमूदने मारल्यानंतर, त्याने कच्छ सोडले आणि सिंधला गेला येथील मूळ रहिवासी असलेल्या भोमिया यांनी मदत मागितली. पण भोमियो सोमनाथचे भक्त होते त्यांनी सोमनाथच्या अपमानाचा बदला म्हणून सुलतानच्या सैन्याला वाळवंटात पराभूत केले.
 
खंडणीच्या पैशासाठी हल्ले होत राहिले
गझनीच्या फारुख सिस्तानी पर्शियन कवीच्या म्हणण्यानुसार, सुलतान अनेक दिवसांच्या भटकंतीनंतर शेवटी सिंधला पोहोचला. तथापि, 'प्रभास याने सोमनाथ' या पुस्तकानुसार, येथून सुलतान थेट मन्सुरा येथे पोहोचला. सुलतानाला मन्सुरामध्ये आश्रय आणि विश्रांती मिळू शकली नाही. तिथेही लढावे लागले. लुटलेली रक्कम ताब्यात घेण्यासाठी खफिफांनी हल्ला केला. महमूदकडे पुरेसे सैन्य नव्हते. त्यांच्याशी खफीफचा सामना करून, सुलतान विजयी झाला आणि नंतर मुलतानकडे निघाला. डॉ. नाझिम यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की, 'महमूदने सिंधू पार केली आणि गझनीकडे प्रवास सुरू ठेवला. मात्र, वाळवंटी प्रदेशात राहणाऱ्या जाटांनी महमूदवर हल्ला केला. यामुळे सुलतानाला अनेक सैनिक गमवावे लागले. 'प्रभास याने सोमनाथ' या पुस्तकानुसार, पंजाबच्या जाटांनी महमूदला रोखले. महमूदने लुटलेला खजिना आपल्याजवळ ठेवला, पण उंट, घोडे आणि इतर प्राणी जाटांनी पळवून नेले. डॉ. नाझिम यांच्या मते, महमूद शेवटी 2 एप्रिल 1026 रोजी गझनीला पोहोचला.
 
Published By- Dhanashri Naik 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चालकाच्या अतिघाईमुळे कंटेनरला धडकला मिनी ट्रक, 6 जणांचा मृत्यू