Publish Date: Tue, 17 May 2022 (17:29 IST)
Updated Date: Tue, 17 May 2022 (17:33 IST)
बरं वाटतं न आपल्याला,कुणी आपल्यांशी संवाद जेव्हां साधतो,
एक धागा असा की जो आपल्यास अलगद जोडतो,
क्षणार्धात मैलो चे अंतर कमी होतं,
आपली आर्त हाक, आपलं कुणी समजतं,
वेगवान होतात घडामोडी, होतें वेळेची बचत,
कित्ती तरी कर्मचारी असतात त्यासाठी राबत,
सुचारु पणे चालवायची असते सगळी प्रणाली,
आपलं समजून सर्वांनी कर्तव्य असतात बजावलेली .
दिवसरात्र ही मंडळी असतात कर्तव्यदक्ष,
तुमची आमची सेवा हेच त्यांचे लक्ष,
सलाम त्यांच्या या सर्व सेवांना, जी ते देताहेत,
दूरसंचार च महत्त्वाचे कार्य,आपल्या पर्यंत पोचवत आहेत.!