Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

म्हणून सलॅड आणि फ्रूट्स खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये

म्हणून सलॅड आणि फ्रूट्स खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये
फळं किवा सलॅड खाणे चांगली सवय असली तरी अनेकदा लोकांना हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुलणे, जड वाटणे अशी समस्या उद्भवते. यामागील मोठं कारण आहे कच्चे फळं किवा सलॅड खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सवय. आयुर्वेदानुसार देखील कच्च्या भाज्या आणि फळं सेवन केल्यानंतर पाणी पिणे योग्य नाही. यानंतर पाणी पिण्यानंतर ब्‍लोटिंगची समस्या येते. 
 
म्हणून पिऊ नाही पाणी
फळांमध्ये उच्च प्रमाणात शुक्रोज, फ्रूक्टोज आणि यीस्ट असतं. फळं खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पाणी आणि अॅसिडचा घोळ पोटात यीस्टसाठी विस्तार होण्यास मदत मिळते. परिणामस्वरूप पोटात गॅस निर्माण होते आणि पोट फुगू लागतं.
 
ओव्हरइटिंग टाळा
फळं अती प्रमाणात खाणे टाळावे. सलॅड आणि फळं खाल्ल्यानंतर पोटाचा त्रास होण्यामागे अयोग्य प्रमाणात सेवन करणे ठरतं.
 
अतिसाराचा धोका
फळांमध्ये अधिक प्रमाणात पाणी असतं आणि फळं खाल्ल्यानंतर पाणी पिण्याने अतिसाराचा धोका वाढतो.
 
चावून खा
फळांचे सेवन करताना पोटात आढळणारे बॅक्टेरिया सामान्यपेक्षा अधिक वेगाने कार्बन डायऑक्साइडचं निर्माण करू लागतात ज्यामुळे पोट जड वाटू लागतं. ज्यामुळे ढेकर येण्याची आणि पोटात गॅस निर्माण होण्याची शक्यता वाढू लागते. त्यामुळे फळं योग्य प्रमाणात आणि चावून चावून खावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘वर्ल्ड अल्झायमर डे : अल्झायमरच्या आजारापासून सावध रहा