Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑक्सिजनची पातळी कायम ठेवण्यासाठी आहारात या 5 गोष्टी समाविष्ट करा

Include these 5 things in the diet to maintain oxygen levels health tips in marathi arogya salla in marathi
, शुक्रवार, 14 मे 2021 (19:25 IST)
कोरोनाकाळात जीवनशैलीत बदल दिसून येत आहे. कदाचित भविष्यात या मध्ये आणखी बदल होतील. कोरोना साथीच्या आजारात, लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयीमध्ये मोठा बदल झाला आहे. लोक त्यांच्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक होत आहेत. या साथीच्या आजाराच्या वेळी आपली ऑक्सिजन पातळी सामान्य कशी ठेवावी जाणून घेऊ या.  
 
1 लिंबू- लिंबू हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. त्याच्या वापरामुळे प्रतिकारशक्ती वाढते . हे वजन कमी करण्यासाठी  देखील खूप उपयुक्त आहे. दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लिंबू ऑक्सिजनची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करते. हे एक नैसर्गिक एंटीसेप्टिक आहे.चेहऱ्यावरील पुळ्या, पुटकुळ्या, मुरूम, काळे डाग,सुरकुत्या कमी करण्यात मदत करतं.आपण लिंबाचं लोणचं देखील खाऊ शकता.
 
2 किवी -किवीला फळांचा राजा म्हणतात. त्यात असलेले व्हिटॅमिन सी,ई,पोटॅशियम आणि फोलेट बर्‍याच रोगांपासून बचाव करण्यास मदत करते. डेंग्यूसारख्या आजारात या फळाचे सेवन करण्यास सांगितले जाते. त्यात भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात जे ऑक्सिजन सामान्य पातळी सामान्य  ठेवण्यास मदत करतात. तसेच त्यामध्ये उपस्थित घटक संसर्गासारख्या इतर आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतं. 
 
3 केळी- केळी खाल्ल्याने शक्ती मिळते, शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास मदत होते.त्यात अल्कालाइन  मुबलक प्रमाणात आढळतात, जे ऑक्सिजनची कमतरता दूर करत.
 
4 लसूण - लसणाला आयुर्वेदिक औषधांमध्ये गणले जाते. भारतीय अन्नाची चव वाढविण्यासाठी याचा अधिक वापर केला जातो. तज्ञांच्या मते, लसणाचे सेवन केल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी सामान्य राहण्यास मदत होते. एवढेच  नव्हे तर कोलेस्टेरॉलच्या आजार झाल्यास लसणाचे सेवन केले जाते. जेणेकरुन रक्त घट्ट होणार नाही.
 
5 दही - दह्याचे सेवन शरीरासाठी उत्तम आहे. या मध्ये व्हिटॅमिन,कॅल्शियम,प्रथिने आढळतात. दररोज जेवण्यात याचे सेवन करू शकता. या मुळे ऑक्सिजन ची कमतरता पूर्ण होते.
पचन शक्ती देखील मजबूत करते. रात्री दह्याचे सेवन करू नये. 
 हे शरीरासाठी दिवसात जेवढे चांगले आहे रात्रीच्या वेळी याचे सेवन करणे घातक आहे. 
 
टीप-  ही सर्व माहिती सर्वसाधारण मताच्या आधारे गोळा केली गेली आहे, अधिक माहितीसाठी, कृपया वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संत्रीच्या अति सेवनाने आरोग्यास हानी होऊ शकते