Publish Date: Fri, 29 Dec 2017 (15:58 IST)
Updated Date: Fri, 29 Dec 2017 (16:03 IST)
गरम कढईतल्या मोहरी पेक्षा
माणसं तडतड करत आहेत
काय झालंय कळत नाही
फारच चीड चीड करत आहेत...........
नातेवाईक असो, मित्र असो
भयंकर स्पर्धा वाढलीय
तेंव्हा पासूनच माणसाची
मानसिक अवस्था बिघडलीय..............
कुणी कुणाला काहीच विचारत
मनानचं कसंही वागतात
आजूबाजूच्या लोकांकडून
जास्तच अपेक्षा ठेवतात.............
कमाई किती खर्च किती
काहीच कुठे मेळ नाही
भेटायला जाणं, गप्पा मारणं
ह्यासाठी कुणालाच वेळ नाही.........
कॅपॅसिटी नसतांनाही
खरेदी उगीच करतात
Salary राहाते तेव्हडीच
तरी हप्तेच जास्त भरतात......
शेजा-यानी 2 व्हीलर घेतली
की हा घेतो 4 व्हीलर
दूध आणायला सांगितले की
मोजीत बसतो चिल्लर............
अरे, अंगापेक्षा बोंगा
कशाला वाढवून बसतो
पगार झाल्या दिवशी
पगार संपल्यासारखा दिसतो.........
पर्सनल लोन, Gold लोन
जे मिळेल ते घेतात
दिलेले पैसे मागितले तर
आपलीच गचांडी धरतात...........
सहनशीलता आणि संयम
कुठे गेला कळत नाही
पॅकेज भरपूर मिळायलंय पण
समाधान मात्र मिळत नाही...........
घरी काय दारी काय
नुसत्या किरकीरी वाढल्यात
नवऱ्याला न सांगताच
बायकांनी भिश्या काढल्यात...........
कितीही साड्या कितीही पर्स
शर्ट, पँटी ला गणतीच नाही
तरीही कुरकुर चालूच असते
धड साडी कोणतीच नाही...........
मग काय ! नवऱ्यानं म्हणावं
तुला अक्कल नाही
बायकोनं म्हणावं
तुम्हालाच काही कळत नाही.........
दोन दोन दिवस अबोला
कशाऊनहीं भांडणं होतात
लग्न झालं की पोरं पोरी
वर्षातच घटस्फोट घेतात.........
पत्नी पीडित नव-यांच्याही
संघटना निघत आहेत
डोळे मोठे करून पोर
बापाकडेच बघत आहेत...........
दिवेलागणी, शुंभकरोती
कुठच्या कुठे गायब झालय
शक्य असेल यामुळेच
माणसां-माणसात वितुष्ट आलय..........
?
चित्त थोडं शांत ठेऊन
जुनी पाने चाळावी लागतील
यदाकदाचित पुन्हा माणसं
एकमेकाशी प्रेमाने वागतील........