Publish Date: Wed, 03 Oct 2018 (13:42 IST)
Updated Date: Wed, 03 Oct 2018 (13:44 IST)
दर दोन तासांनी जेवावं की फक्त दोनदाच जेवावं...यावर केव्हढी ही चर्चा...
पण दर दोन तासांनी तरी थोडं हसावं...दर पंच्चावन्न मिनिटांनी कोणाला तरी हसवावं....असं कोणीच सांगत नाही.
मुळात तुम्ही किती हसता ....हसवता... किती प्रसन्न रहाता ,किती आनंदी रहाता... हे महत्त्वाचे. अन्न कसं पचवता यापेक्षा दुःख कसं पचवता हे जास्त समजूतदारपणाचे काम.... खाण्यापेक्षा हसण्यातील प्रोटिन्स महत्त्वाचे. ते पचवण्यासाठी वेगळा योगा नको...हसता हसताच ते पचतात.