Publish Date: Sat, 08 Apr 2023 (22:46 IST)
Updated Date: Sat, 08 Apr 2023 (22:50 IST)
राजस्थानचे नाव आल्यावर तेथील संस्कृती, राहणीमान, खाद्यपदार्थ, वाळवंट यांचे चित्र डोळ्यांसमोर फिरू लागते. राजस्थान हे आपल्या खाण्यापिण्यामुळे खूप चर्चेत असते. तिथल्या स्पेशल डिशबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यांनाच दाल बाटी चुरमा आवडतो. दाल बाटी चुरमा राजस्थानच्या प्रत्येक घरात बनवला जात असला तरी आता त्याची क्रेझ देशाबरोबरच परदेशातही पाहायला मिळत आहे.
अनेकदा आपण बाटी बनवतो तेव्हा ती एकतर कच्चीच राहते किंवा इतकी घट्ट होते की ती खाणे फार कठीण होते. तुम्हालाही असाच त्रास होत असेल तर आज आम्ही तुम्हाला यावर उपाय सांगणार आहोत. खरं तर, आज आम्ही तुम्हाला बाटी बनवण्याच्या अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यांना अवलंबवून मऊ बाटी बनवू शकता.
बाटी बनवताना पीठाची काळजी घ्या
पीठ मऊ नसावे याची विशेष काळजी घ्या.बाटीचे पीठ जितके घट्ट होईल तितकी तुमची बाटी चांगली होईल. असे केल्याने बाटी खूप कुरकुरीत होते.
पीठ मळताना तुपाची कमतरता करू नका
लोक जास्त तूप वापरत नाहीत असे अनेकदा ऐकायला मिळतात. पण, जर तुम्ही बाटीसाठी पीठ मळत असाल तर त्यामध्ये तुपाचे प्रमाण लक्षात घ्या. तुपामुळे ते आतून मऊ होईल.
पीठ काही वेळ असेच ठेवा-
जेव्हा तुम्ही बाटी बनवण्यासाठी पीठ मळून घ्याल तेव्हा किमान तीस मिनिटे असेच ठेवा. तोपर्यंत तुम्ही डाळ तयार करू शकता.
तुपात बुडवा-
तुपामुळे बाटीची चव खूप वाढते. तयार झाल्यावर तुपात बुडवून घ्या. गरमागरम बाटी तुपात बुडवून ठेवल्यास त्याची चव अनेक पटींनी वाढते.