Publish Date: Tue, 29 Oct 2024 (07:30 IST)
Updated Date: Mon, 28 Oct 2024 (15:55 IST)
भारत देशात सण उत्सव या दिवशी विशेष करून मिठाई वाटली जाते. तसेच ही मिठाई सांभाळणे कठीण होते. तसेच काही मिठाई तर लवकर खराब देखील होते. तसेच ही मिठाई खराब होऊ नये म्हणून आज आपण काही ट्रिक पाहणार आहोत ज्यामुळे अगदी महिनाभर मिठाई खराब होत नाही. तर चला जाणून घेऊन या सोप्प्या ट्रिक
हवाबंद डब्बा वापरा-
मिठाई नेहमी हवाबंद डब्यात ठेवावी. हवा बंद डब्बा मिठाईला हवेच्या संपर्कात येऊ देत नाही. ज्यामुळे मिठाई जास्त काळ ताजी राहते आणि खराब देखील होत नाही. दूध, मलई किंवा मावा वापरणाऱ्या मिठाई रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे केव्हाही चांगले असते. तसेच थंड तापमानात मिठाई जास्त काळ ताजी राहते व ती लवकर खराब होत नाही.
फ्रीजरमध्ये ठेवा-
मिठाईफ्रीजरमध्येही देखील ठेवू शकता. तसेच मिठाई अनेक आठवडे फ्रीझरमध्ये सुरक्षित राहू शकते. जेव्हा तुम्हाला त्यांचा वापर करायचा असेल तेव्हा त्यांना बाहेर काढा आणि सामान्य तापमानात आल्यावर खाऊ शकतात. रसगुल्ला किंवा गुलाब जामुनसारख्या काही मिठाईंमध्ये जास्त ओलावा असतो. ते साठवताना किचन पेपरमध्ये गुंडाळून ठेवा. यामुळे किचन पेपरमध्ये अतिरिक्त ओलावा शोषला जातो. व मिठाईमध्ये जास्त ओलावा राहणार नाही त्यामुळे त्या अनेक आठवडे सुरक्षित राहील.
वेगवेगळ्या मिठाई एकत्र ठेवू नका-
अनेक वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई एकत्र एकाच डब्यात ठेवल्या जातात. ज्यामुळे त्यांचा सुगंध आणि आर्द्रता मिसळू शकते, ज्यामुळे मिठाई लवकर खराब होते. तसेच साठवलेल्या मिठाई नियमितपणे तपासा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik