Publish Date: Tue, 11 Oct 2022 (12:50 IST)
Updated Date: Tue, 11 Oct 2022 (12:54 IST)
यंदा पावसाला अजिबात परतावस वाटेना,
उसंत कशी म्हणून घ्यावीशी वाटेना,
उगा हिंडतोय जिकडे तिकडे उनाड,
बळीराजा गेलाय वैतागून,पडे न उघाड,
कुठं पूर, कुठं धरणा च पाणीच पाणी,
नाकी नऊ आलं , थकला आता चाकरमानी,
पण पावसाला कुणाचीच दया येईना,
सोडून निघून जाईल, चिन्ह काही दिसे ना!
कर बाबा देवा आता तूच काहीतरी,
प्रत्येक ऋतूची मजा घेऊ दे,समतोल राख, आतातरी!!
...अश्विनी थत्ते
Published By -Smita Joshi