rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कर्जापासून मुक्ती हवी असेल तर संध्याकाळी चुकून ही हे काम करू नये

do not do
, सोमवार, 4 मार्च 2019 (11:56 IST)
वास्तुशास्त्रात आर्थिक स्थितीला मजबूत आणि धन-संपत्ती वाढवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. तसेच या शास्त्रात एखाद्या विशेष वेळेस काही गोष्टी करण्याची मनाई देखील आहे. ज्यामुळे तुमच्यावर कर्जाचा डोंगर वाढत नाही आणि घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते. तर जाणून घ्या कर्जापासून बचाव करण्यासाठी कोण कोणत्या गोष्टी संध्याकाळी नाही करायला पाहिजे.
 
1. लक्ष्मीला घरात साफ सफाई फार पसंत आहे. पण लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे संध्याकाळी घरात साफ-सफाई किंवा झाडू नाही लावायला पाहिजे. असे केल्याने घरात  दरिद्रता आणि कर्ज वाढत जात.
 
2. संध्याकाळी झोपणे वास्तुशास्त्रात मनाई आहे. या सवयीमुळे तुमच्या घरात गरिबी वाढते आणि तुमच्यावर कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. झोपण्याच्या जागेवर संध्याकाळी पूजा केली पाहिजे.
 
3. पूजा-पाठ किंवा इतर कोणत्या कामासाठी संध्याकाळी तुळशीचे पान नाही तोडायला पाहिजे. यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती कमजोर होऊ शकते.
 
4. संध्याकाळी ना तर कोणाला पैसे उधार दिले पाहिजे आणि कोणाकडून घ्यायला ही नाही पाहिजे. असे केल्याने तुमच्यावर कर्ज वाढत आणि पैसे येण्याचा प्रवाह देखील थांबतो.
 
5. घरातील भिंत आणि कोपरे घाण नसावे, म्हणून याचे नेमाने सफाई केली पाहिजे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवरात्रीला या सात राशींचे जातक ठरतील भाग्यवान