Publish Date: Fri, 16 Aug 2019 (14:57 IST)
Updated Date: Fri, 16 Aug 2019 (15:06 IST)
प्रत्येकाला वाटते की त्याच्या घरात सुख शांतीचे वातावरण असावे. यासाठी लोक वेग वेगळ्या प्रकारचे उपाय करतात. पण कधी कधी आम्ही नकळत काही अशा चुका करून बसतो, ज्यामुळे घराची सुख शांती दोन्ही जात राहते. आम्ही आमच्या घराला सजवण्यासाठी वेग वेगळ्या वस्तू घेऊन येतो पण यात बर्याच वेळा चुकीच्या वस्तू देखील येऊन जातात ज्यामुळे घरातील ग्रह प्रभावित होतात आणि आम्हाला अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून आम्ही तुम्हाला सांगत आहो अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्या घरात नाही आणायला पाहिजे.
वास्तू विज्ञानानुसार स्वयंपाकघरात कधीपण दुधाचे भांडे उघडे नाही ठेवायला पाहिजे, यामुळे आर्थिक अडचणी येतात. दुधाला नेहमी झाकूनच ठेवायला पाहिजे. बॉन्सायी आणि काटेदार रोपटे घराच्या आत नाही लावायला पाहिजे. यामुळे वास्तू बिघडतो आणि नकारात्मक ऊर्जा घरभर पसरते.
घरात रामायण आणि महाभारताच्या घटनांना दर्शवणार्या चित्रांना नाही लावायला पाहिजे. घराच्या उत्तर पूर्वी भागात जड मुरत्या नाही ठेवायला पाहिजे. शयनकक्षात बिस्तराच्या खाली जोडे चपला नाही ठेवायला पाहिजे. हे नकारात्मक ऊर्जेला तसेच आजार व मानसिक ताण देखील वाढवतो.
लोखंड्याची अल्मारी कधीपण बिस्तराच्या मागे नाही ठेवायला पाहिजे. हे देखील लक्षात ठेवा की लोखंडाच्या वस्तू तुमच्या बिस्तरावर नसाव्या. घराच्या मधोमध पाण्याची टाकी, हॅंडपंप, माठ किंवा दुसरे जल स्रोत नसावे, हे आर्थिक बाबींमध्ये नुकसानदायक असत.
धन संपत्ती आणि पारिवारिक सुख शांतीसाठी बुडत असलेल्या जहाजाचे फोटो घरात ठेवू नये. दान आणि पूजेसाठी आणलेल्या वस्तूंना जास्त दिवसांपर्यंत घरात नाही ठेवायला पाहिजे. देवी देवतांच्या भंग झालेल्या मुरत्या घरात नाही ठेवायला पाहिजे.
webdunia
Publish Date: Fri, 16 Aug 2019 (14:57 IST)
Updated Date: Fri, 16 Aug 2019 (15:06 IST)