Publish Date: Thu, 12 Sep 2024 (15:20 IST)
Updated Date: Thu, 12 Sep 2024 (15:23 IST)
महाराष्ट्रातील ठाण्यामध्ये कबुतरांना चारा देण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. वाद वाढल्यानंतर या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या व्यक्तीने 4 जणांविरोधात तक्रार दाखल केली.
मिळालेल्या माहितीनुसार कबुतरांना चारा घालताना एका व्यक्तीशी चौघांनी मारामारी केल्याची घटना बुधवारी ठाणे शहरात घडली आहे. या सर्वांमध्ये वाद झाला व वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. वादानंतर चार जणांनी एका व्यक्तीला मारहाण केली. वाद वाढत गेल्याने प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. सध्या कापूरबावडी पोलीस ठाण्याचे पोलीस आरोपीचा शोध घेता आहे. पोलिसांनी गुरुवारी या घटनेची माहिती दिली. तसेच ही घटना मानपाडा परिसरातील शिवाजी नगर येथील एका मैदानात बुधवारी दुपारी घडली.
या घटनेबाबत कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या अधिकारींनी सांगितले की, हा माणूस कबुतरांना चारा देत असताना चार आरोपी त्याच्याजवळ आले आणि त्यांनी अनुचित प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांच्यात आपापसात वाद वाढले. पोलिसांनी सांगितले की, वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी त्या व्यक्तीच्या डोक्यावर काठीने वार केले व मारहाणही केली, त्यामुळे तो जखमी झाला.
तसेच गंभीर जखमी व्यक्तीने थेट पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्याच्या आधारावर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
webdunia
Publish Date: Thu, 12 Sep 2024 (15:20 IST)
Updated Date: Thu, 12 Sep 2024 (15:23 IST)