Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात रक्ताचा तुटवडा, रक्तदान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

राज्यात रक्ताचा तुटवडा, रक्तदान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
, शनिवार, 5 डिसेंबर 2020 (11:29 IST)
कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे. 
 
सध्या महाराष्ट्रातील ३४४ रक्तपेढ्यांमध्ये १९ हजार ०५९ रक्ताच्या युनिट आणि प्लेटलेटच्या २ हजार ५८३ युनिट आणि मुंबईतील ५८ रक्तपेढ्यांमध्ये ३ हजार २३९ रक्ताच्या युनिट आणि ६११ प्लेटलेट युनिट उपलब्ध आहेत. केवळ ५ ते ७ दिवस पुरेल एवढाच हा साठा आहे.  
 
या पार्श्वभुमीवर येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या- छोट्या रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करुन रक्त संकलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खुमखुमी त्यांचीच होती, ती चांगलीच जिरली असे म्हणत सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर निशाणा