Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेट्रो कारशेडवरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार यांच्यात संघर्ष

मेट्रो कारशेडवरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार यांच्यात संघर्ष
, मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (17:40 IST)
प्रकल्प लटकवा, अटकवा अन् भटकवा हीच तिघाडी सरकारच्या कामाची नवी पद्धत असल्याचा टोला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंनी आरेमधील मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय घेतला, त्यावेळीच आम्ही त्यांच्या हेतूंवर शंका उपस्थित केली होती. अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्रामुळे मुंबईकरांना त्रास होत असल्याचं आम्ही म्हटलं होतं. मिठागर आयुक्तांची परवानगी घेतली होती का, असा प्रश्न आम्ही त्यावेळी विचारला होता. केंद्रानं पाठवलेल्या पत्रामुळे आमची शंका रास्त होती हे स्पष्ट झालं आहे, असं शेलार म्हणाले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चंद्रकात पाटील यांनी अनेक बाबतीत मला त्रास दिला : हसन मुश्रीफ