Publish Date: Thu, 22 Aug 2024 (09:32 IST)
Updated Date: Thu, 22 Aug 2024 (09:37 IST)
मुंबईहून तिरुअनंतपुरमला जाणाऱ्या विमानाला धमकी मिळाल्यानंतर तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली. तसेच अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान सकाळी ८ च्या सुमारास विमानतळावर उतरले. तसेच प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले आहे. विमानात एकूण 135 प्रवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर दहशद पसरली होती. मुंबईहून तिरुअनंतपुरमला जाणाऱ्या विमानाला ही धमकी मिळाल्यानंतर तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली. तिरुअनंतपुरम विमानतळावर पोहोचताच पायलटने बॉम्बच्या धोक्याची माहिती दिली.
Edited By- Dhanashri Naik