Publish Date: Fri, 13 Dec 2024 (14:48 IST)
Updated Date: Fri, 13 Dec 2024 (15:04 IST)
महाराष्ट्रातील एका आर्थिक कार्यक्रमाला संबोधित करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई हे फिनटेकचे हब बनेल असा दावा केला. ते म्हणाले की , मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची भूमिका मांडली.ते म्हणाले, मुंबई ही केवळ भारताची आर्थिक राजधानी नाही तर लवकरच फिनटेक हब म्हणून देशाचे नेतृत्व करणार या बद्दलचे नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. फडणवीस विश्व हिंदू इकॉनॉमिक फोरमला संबोधित करतांना म्हणाले की , मोदींचे हिंदू विकास दर मॉडेल जगाला नवी दिशा दाखवेल आज भारत देश सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे. हिंदू विकास दराने 1950 आणि 1980 च्या दशकात भारताच्या मंद आर्थिक विकासाकडे लक्ष वेधले.
भारत आर्थिक महासत्ता बनेल आणि महाराष्ट्र देशाचा कणा म्हणून उभारी धरेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई येत्या काही वर्षात देशाची फिनटेक राजधानी बनेल .असे ते म्हणाले.