Publish Date: Thu, 16 Dec 2021 (08:26 IST)
Updated Date: Thu, 16 Dec 2021 (08:29 IST)
मुंबईत कोरोनाव्हायरस ओमिरकॉन व्हेरिएंट केसेसच्या नवीन प्रकाराचा धोका लक्षात घेता, मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे. नवीन वर्षाचे औचित्य साधून साजरे होत असताना कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. देशात आतापर्यंत ओमिक्रॉन प्रकारांची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रातच आढळून आली आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. त्यामुळे 16 दिवसांसाठी कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या 42 टक्के ओमिक्रॉन केसेसचा प्रवासाचा इतिहास नसल्यामुळे प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. जेथे कलम 144 लागू आहे, तेथे पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी आहे. याचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
मंगळवारी, महाराष्ट्रात ओमिक्रॉन प्रकारांची 8 नवीन प्रकरणे नोंदवली गेली . महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने मंगळवारी सांगितले की, राज्यात संसर्ग झालेल्या आठ ओमिक्रॉन रुग्णांपैकी कोणीही अलीकडे परदेशात प्रवास केलेला नाही. आरोग्य विभागाने एका बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, नवीन प्रकरणांसह, राज्यात SARS-CoV-2 च्या नवीन स्वरूपाची लागण झालेल्या लोकांची संख्या 28 झाली आहे. त्यापैकी मुंबईत सात रुग्ण आढळले असून बाधितांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.