Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

PalGhar : जयपूर - मुंबई एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ जवानाचा गोळीबार, चार जणांचा मृत्यू, आरपीएफ जवानाला अटक

rajdhani express
, सोमवार, 31 जुलै 2023 (11:59 IST)
जयपूर - मुंबई सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये आज सकाळी पालघरच्या जवळ गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात आरपीएफ जवानासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणाऱ्या आरपीएफ जवानाला जीआरपीने अटक केली आहे.जयपूर- मुंबई (गाडी क्र 12956) ही मुंबई सेंट्रलच्या दिशेने जात होती.
 
या घटनेबाबत अधिक माहिती देताना पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले, “चेतन कुमार हा आरपीएफ जवान ड्युटीवर होता. त्याने त्याचा सहकारी टीकाराम मीणा यांच्यावर गोळीबार केला.
 
या गोळीबारात 3 सहप्रवाशांचाही मृत्यू झाला आहे. नंतर त्याने चेन ओढली आणि दहीसर आणि मीरा रोडच्या मध्ये उतरला. त्याला भाईंदरच्या आरपीएफ टीमने अटक केली. त्याची चौकशी सुरू आहे. मृत पावलेल्या तीन नागरिकांची ओळख पटवण्याचं कामही सुरू आहे.”
 
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी 5.23 वाजता, ट्रेन क्रमांक 12956 जयपूर एस मध्ये बी5 मध्ये गोळी असल्याची माहिती मिळाली. एस्कॉर्ट ड्युटीमध्ये सीटी चेतनने एस्कॉर्ट इनचार्ज एएसआय टिका राम यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती मिळाली . ट्रेन बोरिवली रेल्वे स्थानकावर पोहोचली आहे. माहितीनुसार, ASI व्यतिरिक्त 3 नागरीकांचा मृत्यू झाला आहे.या जवानाला पकडण्यात आले आहे 
 
आरोपीचा हेतू काय होता आणि त्याने ही गोळी का चालवली हे समजू शकले नाही. सुदैवाने या गोळीबारात आणखी प्रवासी जखमी झाले नाहीत. चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार  होताच ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली. सध्या पोलीस ट्रेनमधील प्रवाशांचे जबाबही नोंदवत आहेत. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेची अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचं ते पुढे म्हणाले.




Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राहुल गांधींचं लग्न हा राजकीय विषय आहे की खासगी?