Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईसह चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट,पुण्याला ऑरेंज अलर्ट

मुंबईसह चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट,पुण्याला ऑरेंज अलर्ट
, सोमवार, 19 जुलै 2021 (08:05 IST)
मुंबईसह चार जिल्ह्यांना  पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी हा रेड अलर्ट देण्यात आला आहे.तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही हवामान विभागामार्फत देण्यात आला आहे. तसेच, पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्यामार्फत जाहीर करण्यात आला आहे.
 
मुंबई,ठाणे आणि पालघरसाठी 19 जुलै ते 22 जुलै या कालावधीसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आहे. तर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या ठिकाणांसाठी 19 जुलैसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.तर 20 जुलैपासून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
 
येत्या 24 तासांमध्ये हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.त्यासोबतच काही भागात ताशी 45 ते 55 किमी वेगाने वारे वाहतील अशीही माहिती हवामान विभागाने दिली आहे. मुंबई तसेच परिसरासह सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठीही 18 जुलैचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वारकर्यांवरील निर्बंध शिथिल केले नाही तर मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात फिरकु देणार नाही; विश्व हिंदु परिषद बजरंग दलाचा इशारा