Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 March 2025
webdunia

राज्यात आजपासून तापमान वाढणार?

राज्यात आजपासून तापमान वाढणार?
मुंबई , शनिवार, 14 मार्च 2020 (12:30 IST)
मुंबईसह राज्यात थंड आणि उष्ण असा तापमानाचा चढउतार पाहायला मिळत आहे. मात्र शनिवारपासून हळहळू तापमानवाढीला सुरुवात होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शुक्रवारी राज्यात कमाल आणि किमान तापमान सरासरीहून कमी नोंदवण्यात आले. त्यामुळे तापमानबदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
शुक्रवारी सकाळी मुंबईत अधिक गारठा जाणवला. सांताक्रूझ येथे किमान तापमान सरासरीपेक्षा ३.७ अंशांनी कमी होतं. त्यामुळे सांताक्रूझ येथे किमान तापमान १७.४ अंश तर कुलाबामध्ये १९ अंश नोंदवण्यात आलं. तसंच किमान तापमानातील ही घसरण शनिवारीही अनुभवायला मिळू शकते, असं प्रादेशिक हवामान विभागाकडून सांगण्यात आलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस