Publish Date: Wed, 12 Apr 2017 (14:18 IST)
Updated Date: Wed, 12 Apr 2017 (14:24 IST)
आंध्रप्रदेशच्या नल्लोर जिल्ह्यातील कावली शहरात एका विद्यार्थ्याने ट्रेनखाली उडी मारुन आत्महत्या केली. कारण मार्क कमी मिळाले नसून तर वार्षिक परिक्षेत 10 पैकी 10 ग्रेड पॉईंटस मिळाले नाही म्हणून आत्महत्या केली. धामुल्लुरी विनय (14) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. विनय हुशार मुलगा होता तो नेहमीच पैकीच्या पैकी गुण मिळवायचा असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. विनयने जे आत्महत्येचे पाऊल उचलले त्यासाठी कुटुंबियांनी अप्रत्यक्षपणे शाळेकडे बोट दाखवले आहे.