Publish Date: Thu, 16 Jan 2025 (19:27 IST)
Updated Date: Thu, 16 Jan 2025 (19:29 IST)
Andhra Pradesh News : आता आंध्र प्रदेशात एक अनोखा नियम लागू केला जाणार आहे. आतापर्यंत लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी कमी मुले जन्माला घालण्याचे धोरण अवलंबले जात होते. पण आंध्र प्रदेशात आता जास्त मुले जन्माला घालण्यावर भर दिला जात आहे.
मिळलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी स्वतः म्हटले आहे की, जर एखाद्या व्यक्तीला दोनपेक्षा जास्त मुले असतील तरच तो सरपंच, नगरपालिका नगरसेवक किंवा महापौर होऊ शकतो. त्यांनी असे सूचित केले की यामुळे लोकसंख्या घट थांबेल. लोकांना अधिक मुले जन्माला घालण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ते धोरणे आणतील असे नायडू म्हणाले. "एक काळ असा होता जेव्हा जास्त मुले असलेल्या व्यक्तींना पंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याची परवानगी नव्हती," असे त्यांनी नुकतेच नरवरीपल्ले येथे पत्रकारांना सांगितले. आता मी असे म्हणत आहे की कमी मुले असलेले लोक निवडणूक लढवू शकत नाहीत. जर तुम्हाला दोनपेक्षा जास्त मुले असतील तरच तुम्ही सरपंच, नगरपालिका नगरसेवक, महानगरपालिका अध्यक्ष किंवा महापौर बनू शकाल.
Edited By- Dhanashri Naik